Sunday, January 29, 2012

२६ जानेवारी

प्रजासत्ताकदिनानिमित्त मला आठवण झाली ती माझ्या शाळेतल्या दिवसांची... त्यावेळेला म्हणजे मी तेव्हा नववीत होते, शाळेत MCC  महाराष्ट्र कॅडेट कोर्स निघाला होता NCC सारखं. त्यासाठी शनीवार व रविवार ठरलेले. शनिवारी tracsuit घालावा लागायचा. शाळेचं  मैदान तसं  बऱ्यापैकी होतं पण तरी गर्दी व्हायची. मग सगळ्यांसोबत वेगवेगळे व्यायाम व्हायचे.
                   
              २६ जानेवारीनिमित्त १ आठवडा आधी  एक स्पर्धा झाली होती परेडची. माझी त्या ग्रुपमध्ये   निवड झाली होती.त्यासाठी रविवारी यावे लागायचे.आमच्या PT  च्या शिक्षिका खूप तयारी करून घ्यायच्या अगदी रोज १-२ तास पण बुडवायला लागायचे, मात्र राहिलेला आभ्यास घरी करावा लागायचाच.
                                                 
                                           आमच्या बाई खूप छान तयारी करून घ्यायच्या. सगळ्यांच्या फक्त टाचा टेकल्या पाहिजेत,हात मुठी बंद आणि सरळ रेषेत एकसाथ आले पाहिजेत.सुरवातीला एकमेकींना हात लागायचे,पाय चुकायचे. सरावानंतर जर चुकले कि पायावर छड्या बसायच्या. मला बसू नये म्हणून मी खूप लक्ष द्यायचे, अगदी घरीसुद्धा सराव करायचे.
                                परेडमध्ये काही मोजक्याच शाळा होत्या.
माझ्या मागच्या मुलीकडून बरेचदा माझा बूट निघायचा. त्यादिवशीपण तिने तेच केलं.
मी पूर्ण परेड तशीच पूर्ण केली.त्याबद्दल बाईंनी कौतुक पण केलं कारण त्यांच्या लक्षात हि गोष्ट आली होती. सगळ्यांना प्रशस्तीपत्रक भेटले होते.


                                                                 काही दिवसांनी आम्हाला युनिफोर्म भेटले. बूट तर सगळ्यांना मोठे आणि एकाचा मापाचे होते मग त्यात स्पंजचे बोळे घालावे लागले होते. राउंड मारताना त्रास व्हायचा मग एक-दोनच मारायचो.
    एकदा सराव चालू असताना पाऊस आला म्हणून आम्ही आडोशाला थांबलो होतो तर बाई लगेच रागावल्या मग काय  तसेच भिजत करावे लागले,सैनिकी शिक्षण ना ते . पण मजा आली होती खूप.
           इच्छा खूप होती सैनिकी क्षेत्रात जायची पण नाही जमलं. निदान काही दिवस का होईना थोडंफार करायला भेटला तेच खूप असा म्हणावा लागेल.                          

Wednesday, January 25, 2012

lyrics

na jaane kyun, hotaa hai ye zindagi ke saath
achaanak ye man
kisi ke jaane ke baad, kare phir uski yaad
chhoti chhoti si baat, na jaane kyun


wohi hai safar, hai nahin
pass mere magar, ab meraa hamsafar
idhar udhar dhoondhe nazar wohi hai dagar

kahaan gayin shaamen madbhari
wo mere, mere wo din gaye kidhar
na jaane kyun, hotaa hai ye zindagi ke saath
achaanak ye man
kisi ke jaane ke baad, kare phir uski yaad
chhoti chhoti si baat, na jaane kyuun ........

Wednesday, January 18, 2012

mann


मनाचा गुंता कधी सुटतच नाही;
कसं कधी कुणात गुंतते कळतंच नाही;

कधी फुलांत तर कधी रानात;
कधी ताऱ्यांमध्ये तर कधी आकाशात;
कधी गाण्यात तर कधी पावसात;
कधी तिच्यात तर कधी त्याच्यात;
कुणाच्या नजरेत तर कधी बोलण्यात;
कुणाच्या स्वप्नात तर कधी कुणाच्या आठवणीत'
होऊन जाते मग मनही अबोल आणि शांत;
घडून जातं सारं मनाच्याही नकळत;

मनाचा गुंता कधी सुटतच नाही;
कुणाच्यातरी आठवणीत रमल्याशिवाय राहवतच नाही.

Sunday, January 15, 2012



सहज ग्यालेरीत उभी होते;नारळाच्या पानातून दिसणारी चंद्राची नाजूक कोर जणू काही मला खुणावत होती. सुंदर सुखद वाऱ्याची झुळूक आणि तिने बरोबर आणलेले क्षण उगीचच    मनाला हुरहूर ,ओढ लावत होते. ती कोर हे सार मला आठवण करून देत होती आणि मग मला ते क्षण आठवले....
                                 अचानक येणारा तो धुंध करणारा सुगंध; त्या वरून ओघळणाऱ्या मोत्याच्या लडी; वाऱ्याच्या झोताने एकमेकात मिसळत होत्या...खाली पडत होत्या.
येणारा सुगंध वेड्या मनाला भुरळ घालत होता;प्रत्येकाला नाही म्हंटले तरी पावसाचे आकर्षण असते.. थोड्याशा गारव्याने उठणारे सुखद शहारे...कधी कोणाबरोबर केलेली धिंगामस्ती नंतर रुसारुसी मग परत एकत्र येणे अशा सुंदर आठवणीत गुंतणे....
                                             कोणाच्यातरी येण्याची ओढ,चाहूल, आणि कुतूहल वाटणे आणि क्षणात सरीवर सरि कोसळू लागणे..मग त्यात मनमुराद चिंब भिजून जाणे...मनाला हवे तेवढे .........पहिला पाऊस असा रुणझुणता..