प्रजासत्ताकदिनानिमित्त मला आठवण झाली ती माझ्या शाळेतल्या दिवसांची... त्यावेळेला म्हणजे मी तेव्हा नववीत होते, शाळेत MCC महाराष्ट्र कॅडेट कोर्स निघाला होता NCC सारखं. त्यासाठी शनीवार व रविवार ठरलेले. शनिवारी tracsuit घालावा लागायचा. शाळेचं मैदान तसं बऱ्यापैकी होतं पण तरी गर्दी व्हायची. मग सगळ्यांसोबत वेगवेगळे व्यायाम व्हायचे.
२६ जानेवारीनिमित्त १ आठवडा आधी एक स्पर्धा झाली होती परेडची. माझी त्या ग्रुपमध्ये निवड झाली होती.त्यासाठी रविवारी यावे लागायचे.आमच्या PT च्या शिक्षिका खूप तयारी करून घ्यायच्या अगदी रोज १-२ तास पण बुडवायला लागायचे, मात्र राहिलेला आभ्यास घरी करावा लागायचाच.
आमच्या बाई खूप छान तयारी करून घ्यायच्या. सगळ्यांच्या फक्त टाचा टेकल्या पाहिजेत,हात मुठी बंद आणि सरळ रेषेत एकसाथ आले पाहिजेत.सुरवातीला एकमेकींना हात लागायचे,पाय चुकायचे. सरावानंतर जर चुकले कि पायावर छड्या बसायच्या. मला बसू नये म्हणून मी खूप लक्ष द्यायचे, अगदी घरीसुद्धा सराव करायचे.
परेडमध्ये काही मोजक्याच शाळा होत्या.
माझ्या मागच्या मुलीकडून बरेचदा माझा बूट निघायचा. त्यादिवशीपण तिने तेच केलं.
मी पूर्ण परेड तशीच पूर्ण केली.त्याबद्दल बाईंनी कौतुक पण केलं कारण त्यांच्या लक्षात हि गोष्ट आली होती. सगळ्यांना प्रशस्तीपत्रक भेटले होते.
काही दिवसांनी आम्हाला युनिफोर्म भेटले. बूट तर सगळ्यांना मोठे आणि एकाचा मापाचे होते मग त्यात स्पंजचे बोळे घालावे लागले होते. राउंड मारताना त्रास व्हायचा मग एक-दोनच मारायचो.
एकदा सराव चालू असताना पाऊस आला म्हणून आम्ही आडोशाला थांबलो होतो तर बाई लगेच रागावल्या मग काय तसेच भिजत करावे लागले,सैनिकी शिक्षण ना ते . पण मजा आली होती खूप.
इच्छा खूप होती सैनिकी क्षेत्रात जायची पण नाही जमलं. निदान काही दिवस का होईना थोडंफार करायला भेटला तेच खूप असा म्हणावा लागेल.

